Posts

Showing posts from March, 2023

दुर्दम्य..असामान्य लोकमान्य

Image
पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. ब्रिटिश अधिकारी रँडच्या आदेशानुसार सोजिरे पुणेकरांवर अनन्वित अत्याचार करीत होते. या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी पुण्यात २२ जून १८९७ रोजी चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला. या हत्येमागे बळवंतरावांचा हात असल्याच्या संशयावरून इंग्रजांनी टिळकांना अटक केली आणि १८ महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. अखेर कोणत्याही सत्काराच्या समारंभात भाग घ्यायचा नाही या अटीवर बळवंतरावांची सुटका झाली. तुरुंगातून बाहेर पडल्यावर बळवंतराव त्यांचे गुरू अण्णासाहेब पटवर्धनांच्या घरी गेले आणि त्यांना नमस्कार केला. अण्णासाहेबांनी त्यांना घट्ट मिठीच मारली. बळवंतरावांच्या देहाची अवस्था पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. ते म्हणाले, "आता पुढे काय विचार आहे?" तेव्हा बळवंतरावांच्या काळ्या ठिक्कर पडलेल्या ओठातून क्षीण पण ठाम आवाजात शब्द उमटले, "पुनःश्च हरि ओम !"         गंगाधर गाडगीळ लिखित "दुर्दम्य" या कादंबरीच्या बाबतीत अशीच काहीशी हकीकत माझ्या बाबतीत घडली. मागच्या वर्षी ही कादंबरी वाचायला घेतली होती पण काही कारणाने ती अर्धवटच सोडावी लागली. मग यावर्षी अगदी ठरव...